रविवार, १० एप्रिल, २०११

का केली मैत्री ही अशी...?



खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ।


हर्षद अ.प्रभुदेसाई....

२ टिप्पण्या: