सोमवार, २ मे, २०११

खेळ काळाचा....

थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल...
की... आपलं हे आयुष्य फक्त,
तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं ।
जसं भूत आणि भविष्यामध्ये,
हे वर्तमान घुसमटत असतं ।

ह्या तिघांमध्ये चालू असतो एक अजबच खेळ...
वर्तमान धावत असतो जणू,
भविष्यास त्या गाठण्यासाठी ।
पण भूत अडवून धरतो त्यास...,
भविष्यात त्याने ह्याला विसरू नये ह्यासाठी ।

पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ...
वर्तमान जातो थकून,
धावता-धावता त्या भाविष्याकडे ।
मग भूत येऊन म्हणतो त्यास...,
थकला असशील तर.. येउन जा थोडावेळ माझ्याकडे ।

आयुष्यभर असाच खेळला जात असतो हा खेळ...
वर्तमान गाठतोय.. तोवर ते भविष्य,
बरंच लांब निघून गेलेलं असतं ।
आणि पाठीमागे राहिल्या त्या भूताचं मात्र,
दिवसेंदिवस वय हे... वाढतच असतं ।

थोडक्यात काय.. ह्या तिघांमधला व कधीही न संपणारा असतो हा खेळ...
कारण.. त्या भविष्यास ह्या वर्तमानाला,
काही केल्या गाठता येत नाही ।
कितीही थकला तरी वर्तमान काही,
त्याच्या मागे धावणं थांबवत नाही ।
आणि भूतदेखील वर्तमानाची पाठही कधीच,
सहजा-सहजी तरी सोडत नाही ।


ह्या सार्‍यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का?...
हे तिघे तीन नाहीत, हा तो एकच आहे ।
वर्तमानात असलेला तोच, त्या भविष्यात येणारा एक वर्तमान आहे ।
आणि ओलांडून गेल्यावर भविष्यास, मागे उरला तोच तो भूत आहे ।
म्हणजेच.. ह्या तिनही भूमिका बजावणारा, एकमेव तो काळ आहे ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा