शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

एक संध्याकाळ अशी....

हा माझा मित्रपरिवार....
तुमच्या मनात आलं असेल की ह्या कवितेसोबत मी हा फोटो का टाकला..?
कारण.."एक संध्याकाळ अशी...."ही कविता मला ह्यांच्या सोबत घालवलेल्या काही क्षणांमुळे सुचली...
ती संध्याकाळ आम्ही खूप मजेत घालवली.
मी तसा गप्पच होतो,कारण मला खरंच काही सुचत नव्हतं.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्यातले ते हास्य-विनोद,हे सारं काही मी टिपत होतो.
माझ्यासाठी हे सारं नवीन होतं,कारण इतका मोठा आणि इतका चांगला मित्रपरिवार मला प्रथमच लाभला.
मी स्वतःला खूप लकी समजतो की,मी ह्या मित्रपरिवाराचा एक भाग आहे...
आणि म्हणूनच त्यांच्यामुळे सुचलेल्या ह्या कवितेसोबत हा त्यांचा फोटो.....
एक संध्याकाळ अशी....,
गजबजाटात हरवलेली ।
गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत,
हसत-खेळत घालवलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
दुःख सारे ते विसरलेली ।
सुखद साजिर्‍या क्षणांनी,
तुडूंब भरून वाहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
डोळ्यांमध्ये ह्या साचलेली ।
मिटूनयेत म्हणता डोळे,
ओघळून खाली ती सांडलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
खाण्या-पिण्यात गुंतलेली ।
टेर खेचत एक-मेकांची,
हास्य-विनोदात गुंगलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
रंगात सार्‍या ह्या रंगलेली ।
रंग..संगतीत मिसळून असे हे,
चित्र देखणे ते साकारलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
सरता-सरता थांबलेली ।
पुन्हा येईल का..? अशी ती,
प्रश्‍नावर..अडून ह्या राहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
संपूच नयेशी वाटलेली ।
संपल्यावरही मनात माझ्या,
रेंगाळत अशी ती राहिलेली ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा